श्रीगोंदा तालुक्यातील शेतीच्या वीजजपंपाचे बिल आकारणी तात्काळ थांबवा : लगड
नगरी दवंडी/प्रतिनिधीश्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्यांचे महावितरण कंपनीने शेतीचे विज पंपाचे बिल आकारणी चालु केली असून अधिच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्याकडून सदरची बिल आकारणी तात्काळ थांबवावी अन्यथा 1 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर शेतकर्या समवेत उपोषण करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी निवेदनाद्वारे दिला.
मागीलवर्षी आलेली कोरोनाची महामारी आणि त्या नंतर झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे , त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असुन तो पुर्णपणे हवालदिल झालेला आहे. त्यातच महावितरण कंपनीने शेतकर्यांचे शेतीचे विजपंपाचे बिल आकारणी चालु आहे . अधिच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांकडून सदरची बिल आकारणी तात्काळ थांबविण्यात येऊन सहकार्य करावे. शेतकर्यांच्या शेतीच्या विजपंपाची होणारी आकारणी न थांबिल्यास दि. 1 फेब्रुवारी रोजी तहसिलदार श्रीगोंदा यांचे कार्यालयासमोर शेतकर्यासमवेत उपोषण करण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी निवेदनाद्वारे दिला.
No comments:
Post a Comment