डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार अरुण वाळुंज यांच्या बेधडक महाराष्ट्र व्यासपीठाला
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेरचे कवी लेखक चित्रपट गीतकार अरुण वाळुंज यांची निर्मिती असलेल्या बेधडक महाराष्ट्र व्यासपीठाला राष्टीय बंधुता साहित्य परिषदेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते हॉटेल सुकांता येथे आयोजित कार्यक्रमात संपन्न झाले. डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या बंधुता आणि संघर्ष या काषाय प्रकाशन च्या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.विविध क्षेत्रातील कार्य करणार्या व्यक्तिमत्वाना तसेच महाराष्ट्रातील साहित्यिक कार्य करणार्या सहा संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. पारनेर तालुक्यातुन सुरू झालेल्या बेधडक महाराष्ट्र या संस्थेला त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार मिळणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया,ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे, सौ. ललिता सबनीस, मुख्य संयोजक विजयकुमार मर्लेचा,मुख्य कार्यवाह प्रा.प्रकाश रोकडे, मधुश्री ओव्हाळ, शंकर आथरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment