सरोष टॉकीजवर टाकलेल्या बॉंम्बला ७८ वर्ष पूर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 22, 2020

सरोष टॉकीजवर टाकलेल्या बॉंम्बला ७८ वर्ष पूर्ण

 सरोष टॉकीजवर टाकलेल्या बॉंम्बला ७८ वर्ष पूर्ण   



नगरी दवंडी

 नगर-मधील झेंडीगेट येथील सध्या बंद असलेली दीपाली टॉकीज म्हणजे पूर्वीची सरोश टॉकीजवर २५ डिसेंबर १९४२ला स्वातंत्र्याच्या आदोलनात सरोष टॉकीज मध्ये इंग्रजांविरुद्ध आदोलनात क्रांतिकारकांनी बॉंम्ब टाकला यामुळे इंग्रज हादरले होते.त्या घटनेला या २५ डिसेंबरला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत पण गेली अनेक वर्षे मागणी करूनही सरोष बॉम्बस्फोटाचे स्मारक किंवा त्याच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी नगर किंवा भिंगारमध्ये होत नाही अशी खंत नोटरी पब्लिक भिंगार शहर काँग्रेस अध्यक्ष आर आर पिल्ले यांनी व्यक्त केली 

  याबाबत अधिक माहिती देताना पिल्ले म्हणाले १९४२ ला महात्मा गांधीच्या चलेजाव चळवळीत मांगीलाल भंडारी यांच्यासह भिंगार मधील विणकर समाजातील महिला व पुरुष यांनी मोर्चा काढला होता त्यावर लाठीहल्ला झाला व पंडितनेहरू,मौलाना आझाद,वल्लभभाई पटेल, श्री कृपलानी आदी नेते नगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध झाल्याने आपण काही तरी देशाकरता करावे हा विचार मनात उत्पन्न झाला त्यातून मग तरुणांनी भूमिगत होऊन संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे,जाळपोळी,असहकार करण्याचे काम भिंगार व नगर मध्ये सुरु केले 

 एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डीनरी फॅक्टरी मधून चोरला व तो एका महिलेने पोटावर बॉम्ब ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून बसने भिंगारला आणला,त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले,हबीब खान,पन्नालाल चौधरी,श्री खोमणे यांच्यावर हि जबाबदारी टाकण्यात आली.ब्रिटीशाची गर्दी संरोष टॉकीजवर जास्त असते म्हणून ती निवडण्यात आली २५ डिसेंबरला रात्रीचा चॉकलेट सोल्जर या चित्रपटाचे शोला तिकीट काढून हबीब खान व रत्नम पिल्ले गेले,मध्यतरात सर्वे केला गेला कोठे ब्रिटिश जास्त आहेत व रात्री ११ वा पिल्लेंनी इशारा केला व हबीबखान यांनी बॉम्ब टाकला,यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मेले व अनेक जखमी झाले खान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ऍम्ब्युलन्स मधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले त्यामुळे कोणाला संशय आला नाही 

  त्यावेळेच्या गुजरात-महराष्ट्र व मुबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट हा झाला नंतर पुणे व इतर ठिकाणी हि मालिका सुरु झाली या घटनेची दाखल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती त्यावेळच्या रेडिओ वर शाबास इंडिया असे उदगार काढले होते या घटनेचा काही केल्या ब्रिटिशाना तपास लागेना,कोणी केला हेच समजेना त्यानी सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली यातील खोमणे हे इंदोरला निघून गेले व बाकीचे सर्व भिंगारमध्येच राहिले,खोमणे यांनी नगरमधील मित्राला पत्र पाठवले होते त्यामध्ये याचा उल्लेख होता इंग्रजांनी हे पत्र फोडून वाचले त्यामुळे या चौघांना अटक झाली व फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती 

 नगरचे स्वातंत्रसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन याना मुबईहुन बोलावून या चौघांची केस चालविण्यास सांगितले बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला,त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी ३ वर्षे विसापूर तुरुंगात डांबले,स्वातंत्र मिळाल्यावर त्याची सुटका झाली 

सध्या पिल्ले यांची मुले भिंगामध्येच असून एक नोटरी आर आर पिल्ले असून दुसरा गोपाळ पिल्ले यांचे आटोमोबाइलचे दुकान आहे,हबीबखान यांची मुले पुण्यात स्थायिक झाली आहेत,चौधरींचे कुटुंब नागपूरला स्थायिक झाले आहे,तर श्री खोमणे यांचा मुलगा नगरला डॉक्टर आहे त्यावेळी देशाला हादरून सोडणारा हा बॉम्बस्फोट होता त्याच्या स्मरणदिन प्रशासकीय पातळीवर व्हावा व त्याच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक किंवा रस्त्याला नावे द्यावीत असे सर्वाना वाटत आहे पण ते दरवर्षी होत नाही 

 या क्रन्तिकारकाची दखल अजूनही सरकारने,जिल्हा प्रशासन,भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड,अहमदनगर महानगरपालिका यांनी घेतली गेली नाही,सरोश बागेत इंग्रज सैनिकांची स्मृतीस्तंभ आहे मात्र या क्रन्तिकारकांच्या नावाचा,यांच्या कार्याचा साधा फलक प्रशासन व मनपाने लावलेला नाही तरी या सर्व क्रांतिकाऱ्याची माहिती व फोटो लावले गेले पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे आहे जेणेकरून नवीन पिढीला माहिती मिळेल तर तर नगर व भिंगामध्ये याची नावे रस्त्याला त्यादिले पाहिजे हीच खरी क्रातींकारी व स्वातंत्र सैनिकाच्या स्मृती ठेवण्यासाठी आवश्यक आहे

No comments:

Post a Comment