ओबीसी, एसटी जनमोर्चाचा शनिवारी जिल्हा मेळावा..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता. मराठा आरक्षण देण्यात यावे. ओबीसी आरक्षण कोणाचाही समावेश नको, नोकरी भरती तात्काळ सुरू करण्यात याव्या, एमपीएससी परीक्षा तात्काळ सुरू करण्यात याव्या, शिक्षक-नोकर भरती कपात न करता करण्यात यावी, महाज्योतीला 100 कोटी निधी मिळावा, जात निहाय जनगणना करण्यात यावी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, बारा बलुतेदारांना आर्थिक विकास महामंडळ जाहीर करण्यात यावे. या महामंडळात 500 कोटीचा निधी मिळावा, एससी-एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, धनगर समाजाचे विविध मंजूर योजनांना 100 कोटी निधी उपलब्ध करून योजना त्वरित सुरू कराव्यात, ओबीसी मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी ओबीसी कोट्यामध्ये विशिष्ट वर्ग तयार करून 4 टक्के सब कोटा देण्यात यावा आणि मुस्लिम समाजातील पोट जातीचा जनगणनेत स्पष्ट उल्लेख करावा.
राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी, व्ही.जे ,एन.टी. सह अन्य अपेक्षित समाजाचा जिल्हा मेवाळा नगर शहरात आयोजित करण्यात आला आहे. येथील टिळक रोडवरील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालयात शनिवारी (दि.26) स.11.30 वा.हा मेवाळा होणार असून, यावेळी ओबीसीचे नेते बाळासाहेब सानप सह अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी राज्यातील ओबीसी सह उपेक्षित समाज संघटित करण्याचा निर्धार करून ओबीसीचे आरक्षण वाचविणे आणि विविध समाजाच्या प्रलंबित ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाची निर्मिती झाली आहे. राज्याचे नेते ना. विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब सानप आदी याप्रश्नी महाराष्ट्रात संघटित शक्ती उभी करीत आहे. त्यानुसारच नगर शहरात संघटन करण्यात आले आहे.
ओबीसी, व्ही.जे.,एन.टी आधी समाज विविध संघटनेत विभागाला असला तरी मूळ प्रश्न आणि समाजाचे हित ओळखून सर्व संघटना एकमेकांना सहकार्य देत एकत्र आहे आणि भविष्याचा विचार करता सर्वांनी संघटित असल्याशिवाय पर्याय नाही, म्हणूनच दि. 30 चा मोर्चा रद्द जरी झाला असला तरी बंदिस्त सभागृहात ला मेळाव्यासाठी मोर्चातील सर्वच प्रयत्न करीत आहे.
मेळाव्याला विविध 50-55 समाजाचे प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील, असे नियोजन आयोजकांनी केले आहे. नगर मध्ये ओबीसी, व्ही.जे.,एन.टी. सह विविध समाजाचे संघटन बांधणी राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. संपाटीत शक्तीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार तर नाहीच पण, विभागला गेलेला उपेक्षित समाज भविष्याची नांदी ओळखून एकत्र वाटचाल करेल आणि पुढची पिढी अपेक्षित राहणार नाही याची दक्षता घेणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणाचाही विरोध नाही पण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी आमची प्रथम पासूनच भूमिका आहे. ओबीसी, व्ही.जे.,एन.टी. आदि समाजाच्या हक्कासाठी ही चळवळ आहे. मराठा समाजाची संघटित ताकद ही आमची प्रेरणा असून मोठ्या भावाच्या भूमिकेत मराठा समाज तर आम्ही सर्व लहान भाऊ असं आता आहे. लहान भावाच्या हक्काला मोठा भाऊ संमती देतो, ही आपली संस्कृती आहे असं मत ओबीसी, व्ही.जे., एन.टी जनमोर्चा द्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी रमेश सानप, चंद्रकांत फुलारी, अशोक सोनवणे, हाजी शौकत भाई तांबोळी, बाळासाहेब भुजबळ, शशिकांत पवार, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब बोराटे, हरिभाऊ डोळसे, भगवानराव फुलसौंदर, संजय आव्हाड, अभय राजे, अनिल निकम, संजय जाधव.
No comments:
Post a Comment