कल्याण रोड परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 12, 2021

कल्याण रोड परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था करा.

 कल्याण रोड परिसरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था करा.

महापौरांच्या पाणीपुरवठा आढावा बैठकीत सूचना...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. पाणीपुरवठा अपुरा तर आहेच पण काही ठिकाणी घाण पाणी ही येत आहे. याची गंभीर दखल घेत महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी काल पाणीपुरवठा विभागाची बैठक घेउन या भागातील नागरिकांना चार दिवसांनी पाणी मिळेल याची कारवाई करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभाग जलअभियंता परिमल निकम यांना दिल्या.
 निकम यांनी या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्ये बाबत वेळोवेळी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. तसेच या भागातील शिवाजीनगर या ठिकाणी उंच पाण्याची टाकी बांधण्यात आलेली असून या टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी संपवेलचे काम सुरू आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात येईल.फेज 2 योजनेचे काम देखील याभागात झालेले आहे. त्यातून पाण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. परंतु हे काम करण्यासाठी संपूर्ण लाईन चेक करण्याचे काम सुरू आहे. घाण पाण्याबाबत येत्या तीन चार दिवसामध्ये नियोजन करून घाण पाणी कोठून येते हे शोधून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, कल्याण रोड परिसरात नागरिकांना बर्‍याच दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. याबाबत संबंधीत अधिकारी ,कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली सदर बैठकीमध्ये या भागासाठी येणार्‍या पाण्याबाबत माहिती घेतली. कल्याण रोड परिसरात काही ठिकाणी घाण पाणी येत आहे व तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा करण्यास बराच कालावधी लागत आहे. याबाबत मा.महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी जलअभियंता श्री परिमल निकम यांना या भागातील पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टिने नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. घाण पाणी येणार नाही याबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या. तसेच या भागातील नागरिकांना चार दिवसांनी पाणी मिळेल यादृष्टिने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नागरिकांना पिण्याचे पाणी पुरशा प्रमाणात मिळण्याच्या दृष्टिने फेज-2 च्या पाईप लाईन मधून पाणी देण्याबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. येत्या आठ दिवसामध्ये पाणी पुरवठा सुस्थितीत होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे याबाबत पुढील सोमवार बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये कार्यवाही न झाल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असे त्या म्हणाल्या.
 नगरसेवक शाम नळकांडे ,सचिन शिंदे, यांनी या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठया प्रमाणात आहे याबाबत वेळोवेळी बैठका घेवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कळविण्यात आले आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे त्यांचा रोष वाढतो. पिण्याचे पाणी 4 ते  5 दिवसांनी जरी मिळाले तर या भागातील पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. याकरिता तातडीने योग्य ते उपाय योजना करण्याच्या सुचना त्यांनी मांडल्या. यावेळी नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, माजी नगरसेवक अनिल बोरूडे, संजय शेंडगे जलअभियंता परिमल निकम, अभियंता गाडळकर, राजेश लयचेट्टी, राजेंद्र नराल, हेड व्हॉलमन मनोज शिंदे, अपाक, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment