शेतकरी हिताच्या निर्णयात पत्रकारांची नेहमीच साथ : घिगे
तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीचा सत्कारनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळोवेळी घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयात नगर तालुक्यातील पत्रकारांचे मोठे योगदान असते . यामुळेच या निर्णयांची राज्य पातळीवर दखल घेतली जाते असे गौरवोदगार नगर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले .
नगर तालुका पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीचा मा . खा . दादा पाटील शेळके बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती घिगे बोलत होते.अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे सभापती व माजी जि.प. सदस्य सुरेश सुंबे होते. यावेळी उपसभापती संतोष म्हस्के, माजी सभापती विलासराव शिंदे, माजी उपसभापती रेवणनाथ चोभे, संचालक शिवाजी कार्ले, उद्धव कांबळे, बाळासाहेब मेटे, बाळासाहेब निमसे, बहिरू कोतकर , संतोष कुलट आदि उपस्थीत होते. यावेळी सभापती घिगे म्हणाले की नगर बाजार समितीने नेहमीच शेतकर्यांच्या आर्थिक हिताचा विचार करून विविध निर्णय घेतले. शेतकर्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा हिच आमची भावना आहे यासाठी आम्ही जे निर्णय घेतो त्याला पत्रकारांची साथ असते म्हणुनच राज्यभर नगर बाजार समितीचा नावलौकीक झाला आहे. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड, सचिव दत्ता इंगळे, खजिनदार ज्ञानदेव गोरे, माजी अध्यक्ष जितेंद्र निकम, नितीन देशमुख, सुनील चोभे, आदिनाथ शिंदे, सचिन शिंदे , सागर दुस्सल आदी पत्रकार उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा बाजार समितीचे संचालक दिलीप भालसिंग यांनी केले .
No comments:
Post a Comment