अभिमन्यु युवामंचची जनता कर्फ्यूची मागणी.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये कोविड-19 चे रुग्ण रोज हजारोंच्या संख्येत वाढत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेडही मिळत नाहित. बेड मिळण्यासाठी 2-3 दिवस थांबावे लागते. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यात भर म्हणजे प्रशासनाचा भोंगळा कारभार हे सर्व लक्षात घेता कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण नगर शहरामध्ये जनता कर्फ्यू लावावा अशी मागणी अभिमन्यू युवा मंच संघटनेच्यावतीने मनपा आयुक्त यांच्यावतीने करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष अभिमन्यू जाधव यांनी आयुक्तांना निवेदन देऊन ही मागणी केली.निवेदनावर ऋतिक आडेप, गणेश पुठ्ठा, ऋषिकेश बिडकर,, किरण गोंधळ यांच्या सह्या आहेत.खासदार सुजय विखे यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment