आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता मनपा 14 दिवस बंद!
नगरी दवंडी/प्रतिनिधी अहमदनगर ः अहमदनगर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावभाच्या काळात नागरिक कामासाठी मनपा व प्रभाग कार्यालयात गर्दी करत आहेत. त्यामुळे मनपा कर्मचारी व अधिकारी ही कोरोनाग्रस्त होत आहेत. मनपा कर्मचारी युनियनने संप पुकारून 14 दिवस वर्क फ्रॉम होम काम करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आजपासून 14 दिवस मनपा कार्यालय व प्रभाग कार्यालयेही बंद अत्यावश्यक सेवा वगळुन ठेवण्यात येणार आहे. आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, अग्निशामक यातून वगळण्यात आला आहे. महानगरपालिका कर्मचारी युनियनने संप पुकारल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी मनपा विषयी काम करत व तक्रारी बाबत मनपा व प्रभाग कार्यालयात न येता प्रभाग अधिकार्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे. आयुक्त यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की कोरोनाचा नगर शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी आपल्या मनपा विषयक कामकाजासाठी तक्रारीसाठी मनपा व प्रभाग कार्यालयात समक्ष येऊ नये त्याऐवजी मनपाचे हेल्पलाइन नंबर 0241 2343622 या नंबरवर नोंदवावे. हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंदवूनही समस्या न सुटल्यास मुख्य कार्यालयातील कामकाज संदर्भातइशहाजहान तडवी सहा. आयुक्त मो. नं.9561004640 तर प्रभाग कार्यालयातील कामकाजा संदर्भात 1) जितेंद्र सारसर प्रभाग अधिकारी सावेडी मो. 9561818880, 2) दिनेश सितारे प्रभाग अधिकारी शहर मो. नं.7709792284, 3) संतोष लांडगे प्रभाग अधिकारी झेंडीगेट मो.7588504905, 4) नाना गोसावी प्रभाग अधिकारी बुरुडगाव मो.9561004613 तरी नागरिकांनी आपले कामकाज व समस्येसंदर्भात दिनांक 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2020 या कालावधीत वरील मोबाईल नंबर व फोन नंबरवर संपर्क साधा असे आवाहन आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. |
No comments:
Post a Comment