शनिवार पासून कांदा लिलाव बेमुदत बंद
नगरी दवंडी / प्रतिनिधी
अहमदनगर : स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समिती मध्ये शनिवार (दि.4) पासून कांदा लिलाव बेमुदत बंद राहणार आहे. माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद न मिटल्याने शनिवार ( दि 4) पासून पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी कळविले आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती उपबाजार समिती येथे विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment