स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देऊ - उपमहापौर.
कापड बाजार ते लालटाकी रोडपर्यत मनपाचे स्वच्छता अभियान.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः संत गाडगेबाबा यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व कीर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले आहे. आज ही आपण स्वच्छतेवर काम करत आहोत. संत गाडगेबाबा यांचा आदर्श बाळगून स्वच्छतेचे महत्व नागरीकांना पटवून देऊ. केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेवर काम करत आहे. त्याच धर्तीवर अहमदनगर महानगरपालिकेचनेही शहरात स्वच्छता मोहीम राबवायला सुरुवात केले असल्याचे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केले.
उपमहापौर पुढे म्हणाले की, अहमदनगर महानगर पालिकेने महिन्यातून दोनदा शहर स्वच्छ अभियान सुरू करण्यात आले आहे.या माध्यमातून शहर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे आपले शहर स्वच्छ सूंदर करण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मदत होणार आहे,स्वच्छतेमुळे साथीच्या आजारांच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
यावेळी स्थायी समितीचे सभापती मा.सचिन जाधव,नगरसेविका नगरसेविका शैलाताई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे,अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे,दिनेश सिनारे,वैभव जोशी,मेहर लहारे,शंकर शेडाळे, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment