मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची माफी मागावी अन्यथा...शासकीय पूजेसाठी पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 15, 2021

मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची माफी मागावी अन्यथा...शासकीय पूजेसाठी पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही!

 मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची माफी मागावी अन्यथा...शासकीय पूजेसाठी पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही!

विश्व हिंदू परिषदेची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने, दर्शन या वरील प्रतिबंध दूर करावे. जसे कार्यालयात, बस प्रवासात, थिएटर किंवा हॉटेल मध्ये 50 % उपस्थितीला मान्यता दिली आहे तशी ह्या अनुष्ठानांना अनुमती द्यावी.
विविध स्तरांवरील झालेल्या वारकरी बैठकीत असे निदर्शनास आले.शासनाने-प्रशासनाने वारकर्‍यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली.सरकारने वारकर्‍यांना चर्चेला बोलावून त्यांची दिशाभूल केली आहे. पंढरपुरातच झालेल्या मतदान प्रक्रियेच्या प्रचार सभांना कोरोनाची नियमावली लागू होत नव्हती का?सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासानाच्या बळाने वारकर्‍यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत.महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे.भररस्त्यात वारकर्‍यांचे पारंपारिक गणवेश  व भगवा ध्वज उतरवायला लावून, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणार्‍या, आदरणीय हरी भक्त पारायण निरपराध संताना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणार्‍या मा. मुख्यमंत्र्यांनी वारकर्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे. लवकरात लवकर सरकारने वारकर्‍यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास साधू संत व वारकरी यांच्यावरील अन्याय न थांबविल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही.असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे.  
रामायणाचार्य वासुदेव महाराज खेडकर महाराज म्हणाले कि,महाराष्ट्राची भूमी ही साधू-संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे.वारी हा वारकरी संप्रदाय व वारकर्यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.देशात सर्वत्र जन जीवन सामान्य होत असताना. हॉटेल्स,मॉल, दारूची दुकाने,बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत.त्यात विना मास्क फिरणार्‍या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे.लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत.परंतु शिस्तप्रिय,आज्ञाधारक वारकरी सम्प्रदायाची अडवणूक करण्याचे काम हे सरकार करीत आहे. दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच कोरोनाचे नियम पाळून तपासणी करून प्रवासाची परवानगी द्यावी. संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावात न जाता गावाबाहेर माळरानात मुक्काम करतील.मानाच्या पालखी सोबत किमान 50 वारकर्यांना परवानगी द्यावी.वारकर्यांना अटक करून सरकार वारीची परम्परा खंडित करीत आहेत.असे सांगितले.जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविक केले तर गौतम कराळे यांनी आभार मानले
नगर येथे विश्व हिंदू परिषद आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी बोलत होते.याप्रसंगीभागवत व रामायणाचार्य वासुदेव महाराज खेडकर,कार्याध्यक्ष अँड जय भोसले,मिलिंद मोभरकर,जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गन्धे,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,सहमंत्री गौतम कराळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment