शहरातील नागरिक, सामाजिक संस्थांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे - उपमहापौर.
मनपा राबवणार दर महिन्याच्या 30 तारखेला स्वच्छता अभियान...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महानगरपालिका दर महिन्याच्या 30 तारखेला स्वच्छ सुंदर हरित नगरची संकल्पना राबवणार आहे, या माध्यमातून नगर शहर स्वच्छ सुंदर हरित होण्यास मदत होईल, यामध्ये नगरसेवकांन बरोबर शहरातील नागरिकांनी विविध सामाजिक संघटनांनी, गणेश मंडळ व मित्र मंडळाने व प्रतिष्ठाने पुढे यावे याचबरोबर युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे व या अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
महापालिकेच्या वतीने स्वच्छ सुंदर हरित नगरची संकल्पना राबवण्यासाठी घनकचरा विभाग, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग व बांधकाम विभागाची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्र सरकार भारत स्वच्छ अभियानाची संकल्पना राबवून शहरे स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेत आहे,याच बरोबर राज्य सरकार माझी वसुंधरा अभियान राबवत आहे. या दोन्ही अभियानामुळे नगर शहराचं स्वच्छ शहर निर्मितीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. उपमहापौर गणेश भोसले यांनी अधिकारी व कर्मचारी यांना विविध सूचना देताना सांगितले की, महिन्याच्या तीस तारखेला बांधकाम विभाग. घनकचरा विभाग अतिक्रमण विभाग व उद्यान विभागातील कर्मचार्यांनी शहरातील ठरुण दिलेल्या प्रभागांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवणार आहे, या अभियानामध्ये नागरिक व विविध संघटनांनी सहभागी व्हावे, जेणेकरून शहर स्वच्छ सुंदर हरित होण्यास मदत होईल, व नगर शहराची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल असे ते म्हणाले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले शहर अभियंता सुरेश इथापे. घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ, शंकर शडळे. उद्यान विभागाचे प्रमुख मेहर लहारे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री बल्लाळ. केके देशमुख. श्री बिडकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment