"या" दाखल्याची अट शिथिल करण्यासाठी पंचायत समिती सभापतींचे निवेदन
नगरी दवंडी / प्रतिनिधी
अहमदनगर : महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेतील विहीर प्रस्तवासाठी लागणाऱ्या पटपाणी लाभ नसल्याबाबतच्या दाखल्याची अट शिथिल करण्यासाठी आज नगर तालुका पंचायत समिती सभापती सुरेखाताई गुंड व उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांना निवेदन दिले.
नगर तालुक्यातील विहीर प्रस्तावासाठी पाटपाणी नाही असा दाखला मागितला जातो. तरी तो दाखला लघु पाटबंधारे नगर यांच्याकडून घेतला जातो, त्या दाखल्याचा अर्ज नगर मध्ये केला जातो व तो श्रीगोंदा येथे मिळतो. त्यासाठी शेतकऱ्यांना मानसिक , आर्थीक व शारीरिक त्रास होतो व वेळेचा अपव्यय होतो. तसे पाहता नगर तालुक्यात कोठेही पाटपाणी योजना अस्तित्वात नाही त्यामुळे सदर दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी निवेदद्वारे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment