उपनगर भागातील प्रभाग क्रमांक एक मधील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा- दिपालीताई बारस्कर
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या दोन महिन्यापासून सावेडी उपनगर भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे प्रभाग क्रमांक 1 मधील यशोदा नगर,नम्रता कॉलनी, बरबडेवस्ती, कादंबरी नगरी, तागड वस्ती, वाणी नगर, सुखसागर कॉलनी, आयोध्या नगर, सप्तशृंगी कॉलनी, गायत्री पार्क, कुशाबा नगर, प्रशांत नगर, पंचवटी कॉलनी दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो त्या दिवशी कमी दाबाने पाणी येते त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.
त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहे, यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या परंतु मनपा प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीर यांने लक्ष दिले नाही, प्रभाग क्रमांक 1 मधील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या सोमवारी मनपा आयुक्तांच्या दालनात प्रभागातील महिलांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे नगरसेविका दिपालीताई बारस्कर यांनी दिला.
No comments:
Post a Comment