अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलगुरूंना निवेदन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तरनगरच्या वतीने कृषी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या बाबत मा. कुलगुरू सरांना दि. 07/07/2021 रोजी चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विद्यार्थी हिताच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून सदर विषय विद्यापीठ प्रशासनाने तातडीने मार्गी लावावे अशी मागणी अभाविप उत्तरनगरच्या वतीने केली व मा. कुलगुरू सरांनी सर्व विषयाबाबद सकारात्मकता दाखवली आहे तसेच आकामी काळात अभाविप विद्यार्थी प्रश्नाचा, हिताचा पाठपुरावा करत राहिल असे उत्तरनगर अभाविप जिल्हा महाविद्यालय प्रमुख प्रफुल्ल व प्रकाश खपके यांनी सांगितले. यावेळी ओमकार खपके, निखिल कुलकर्णी, जीतेश साळुंके, संतोश तांबे, महेश खपके आदि अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment