कुठे गेला शेतकर्यांचा पाणीदार नेता?
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंची मंत्री गडाखांवर टीका...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात मी आमदार असताना मुळा धरणातून वेळेवर शेतकर्यांसाठी आवर्तन सोडली होती तरीसुद्धा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी यांनी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत आंदोलन केले होते. आता तर ते राज्याच्या सरकार मध्ये जलसंधारण मंत्री आहेत आता कुठे गेला शेतकर्यांनचा पाणीदार नेता. नेवासा तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे, मतदार संघात ते दिसत नाही शेतकर्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात त्यासाठी मतदार संघात शेतकर्यांशी संवाद साधावा लागतो परंतु मंत्रीमहोदय मुंबई येथे एसी मध्ये बसून राहतात, शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आता विसर पडला आहे असा आरोप मा. आमदार.बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.
येत्या आठ दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील अश्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले या प्रसंगी ते बोलत होते.
जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. पालकमंत्री व जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकर्यांना वार्यावर सोडल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले. शेतकर्यांनी पेरण्या केल्या नंतर पाऊसाने दडी मारली आहे 15 ते 20 दिवसापासून पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकर्यांची उभी पिके जळू लागली आहे.शेतकरी आधीच कोरोना महामारीच्या संकटात सापडला असल्याने आर्थिक अडचणीत आहे.शेतकर्यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातुन शेती साठी अवर्तन सोडावे शेतकर्यांनच्या हाता तोंडाला आलेले उभी पिके जळून चालली असून येत्या आठ दिवसांमध्ये मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकर्यांसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केले. याप्रसंगी रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे, अमित गटने आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment