पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात कॉग्रेस आक्रमक... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात कॉग्रेस आक्रमक...

 पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात कॉग्रेस आक्रमक...

सोमवारी शहरात सायकल रॅली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात येत्या आठवडाभर सर्व तालुक्यांमध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्र सरकार विरोधात भाववाढीच्या निषेधार्थ प्रत्येक तालुक्यात सायकल रॅली, महिलांच्या वतीने गॅस वाढी विरोधात आंदोलन, शेतकर्‍यांचे आंदोलन, युवक काँग्रेसचे आंदोलन याचबरोबर सरकार विरोधात सह्यांची मोहीम असे विविध निदर्शने करण्यात येणार असून महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता शहरात सायकल रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली आहे.
या निदर्शनाबाबत माहिती देताना साळुंके म्हणाले की याबाबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांची ऑनलाईन बैठक झालेली आहे. येत्या आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे व काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अ.नगर शहरात भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहराध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांसह विविध पदाधिकार्‍यांनी केले आहे.
या ऑनलाईन बैठकीत आमदार डॉ. तांबे म्हणाले की, केंद्र सरकारने मनमानी धोरण सुरू केले आहे. हे सरकार पूर्णपणे शेतकरी कामगार सर्वसामान्यांच्या विरोधी धोरण घेत असून या धोरणाचा निषेध करण्यासाठी आपण जनजागरण मोहीम आयोजित केली आहे. गावपातळीपर्यंत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून केंद्र सरकारच्या जुलमी  धोरणाविरुद्ध तीव्र निषेध नोंदवावा. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ होत नव्हती मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या बॅरल च्या किमती अत्यंत कमी असतानाही मोदी सरकारने मात्र पेट्रोल डिझेल दरवाढ करून भरमसाठ लूट सुरु ठेवली आहे या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे असे आवाहन केले.
याच बैठकीत  आमदार कानडे म्हणाले की, मोदी सरकारने फक्त भांडवलदारांना साठी कायदे व नियम बनवणे सुरू केले आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. केंद्र सरकारमध्ये नवीन मंत्री आले म्हणून सर्वसामान्यांना कोणताही फरक पडणार नसून त्यांच्या जीवनात फरक पडावा यासाठी काँग्रेसच काम करत असून ही भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करण्यासाठी करावे. या बैठकीत  समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राज्य सरचिटणीस उत्कर्षाताई रूपवते, कार्याध्यक्ष सचिन गुजर यांसह सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment