‘संवाद’ चर्चा सत्रात आ. संग्राम जगतापांचा नगर शहर विकास संकल्प - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

‘संवाद’ चर्चा सत्रात आ. संग्राम जगतापांचा नगर शहर विकास संकल्प

 ‘संवाद’ चर्चा सत्रात आ. संग्राम जगतापांचा नगर शहर विकास संकल्प

येत्या दोन वर्षात अनेक प्रकल्प सुरू होतील!
मागील काळातील नकारात्मकता उगाळून चालणार नाही.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहराशी माझी नाळ जुळलेली आहे दुसरा कुठला विचार माझ्या मनात येत नाही  त्यामुळे अत्यंत कुठे गेलो तरी तेथे फार काळ माझं रमत नाही संवाद उपक्रमातून नव्या संकल्पनांना चालना मिळते या दृष्टीने मी स्वतः प्रयत्नशील आहे शहराविषयी असलेली प्रतिमा पुसण्याचा व त्यातून शहराचे नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना हातात हात घालून करावा लागेल संवाद उपक्रमातून हा संकल्प आपण करू महानगरपालिकेचे सुसज्ज रुग्णालय, सावेडी नाट्यगृह, अमृत पाणी योजना हे प्रकल्प नजीकच्या काळात पूर्ण होतील याशिवाय शहरातील नगर पुणे रोड वरील उड्डाणपूल प्रगतिपथावर असतानाच पत्रकार वसाहत चौक ते सावेडी नाका या उड्डाणपुलासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने पुढचा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल कोरोनाचे संकट आले नसते तर यातील बर्‍याच गोष्टींची उभारणी सुरू झाली असती येत्या दोन वर्षात बरेचसे प्रकल्प सुरू होतील मागील वीस पंचवीस वर्षातील नकारात्मकता उगाळून आता चालणार नाही ती दूर केली पाहिजे अशी अपेक्षा आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद संस्थेच्या वतीने फरत एक्झिक्यूटिव्ह येथे आयोजित संवाद उपक्रमात आमदार संग्राम यांनी चर्चासत्रामध्ये भाग घेतला.
संवाद संस्थेचे अध्यक्ष उबेद शेख यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे डॉ.गिरीश कुलकर्णी व फरत एक्झिटयूचे संचालक अतीक शेख यांच्या सहकार्य लाभले व आमदार जगताप यांनी या उपक्रमात उपस्थितांशी संवाद साधला व शहराच्या विकासावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चर्चा करून विविध प्रश्नांवर वाचा फोडली व विविध योजना मांडल्या.
अहमदनगर शहराच्या विकासात बर्‍याच उनिवा आहेत ही कबुली देताना आमदार संग्राम जगताप यांनीही नकारात्मकता दूर करण्याचे आव्हान केले मागील दीड वर्षात कोरोणाचे सावट होते मात्र त्यावर मत करून अनेक योजना आता विविध स्तरावर मार्गी लावण्याचा अंतिम टप्प्यात आहे शहराच्या विकासाचा हा अनुशेष नजीकच्या काळात भरून काढण्यासाठी नगरकरांच्या सक्रिय सहभागाची नितांत गरज आहेत या संवाद उपक्रमातून ही प्रतिक्रिया मूर्त रूप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  
याप्रसंगी डॉ सोनवणे, डॉ अतुल खालकर, डॉ.हर्षवर्धन तंवर, डॉ.अविनाश मोरे, डॉ.एम के शेख, डॉ.इमरान शेख, महेंद्र कुलकर्णी, माणिक विधाते, डॉ.निसार शेख, भूषण देशमुख, इंजि. कुलकर्णी, देवशिष शेंडगे, सौ.अक्षवैता शेंडगे, करीम हुडेकरी, अशोक गुंजाळ, अभिजित खोसे, जावेद शेख, यास्मिन शेख, सुहास मुळे, सुनील काळे, देवकुळे, सचिन जाधव, निखिल वारे, संजय गुगळे, समीर खान, रफिक मुंशी आदींसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment