सक्कर चौक ते कोठी नालेसफाई व रस्ता दुरुस्तीचे काम सुरू.
मनसेच्या पाठपुराव्याला यश.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सक्कर चौक ते कोठी रस्त्याच्या बाजूला असलेली गटार हि मातीच्या भरावा मुळे तुंबल्या मुळे सक्कर चौक येथील रहिवाशी त्रस्त झाले होते. त्यांच्या घरात पावसाचे व ड्रेनेजचे तुंबलेले पाणी घरात घुसू लागल्यामुळे नाहक त्रास होत होता. उड्डाणपूल व भूयारी गटार योजनेच्या कामामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे अहमदनगर पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. या समस्यांची दखल मनसे सचिव नितीन भुतारे यांनी घेवून मनपा प्रशासनाला जाब विचारला होता. मनसेच्या प्रयत्नांमुळे तुंबलेल्या गटारीची साफसफाई व उड्डाणपुलावरील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. नागरिकांनी मनसेला याबद्दल धन्यवाद दिले आहेत. तुंबलेल्या गटारीचे नालेसफाई चे काम व पुणे महामार्गावरील उड्डाण पुलामुळे व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी सुनिल खांडेकर, अभी खांडेकर, तसेच महानगरपालिकेचे अधिकारि भालेराव, उड्डाणपुलाचे काम करणार्या कंपनी चे अधिकारि व कर्मचारी तसेच स्थानिक नागरीक उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment