साफसफाई कर्मचारी हा समाजातील महत्त्वाचा दुवा ः बनसोडे
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त टिफिनचे वाटप
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मनपा सफाई कर्मचारी आपले दैनंदिन साफसफाईचे काम प्रामाणिकपणे करत असल्यामुळे नगर शहर स्वच्छ राहण्यास मदत होते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागतो कोरोना संकट काळामध्ये मनपा सफाई कर्मचार्यांनी आपला जीव धोक्यात घालून साफसफाईचे काम करत होते.कोविड काळात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे,कोविड काळात कंटेनमेंट झोन असतानाही आपल्या जीवाची परवा न करता त्याठिकाणी जाऊन स्वच्छतेचे काम करत होते स्वच्छता कर्मचार्यांमुळे भारत स्वच्छता अभियानामध्ये नगर शहराला स्वच्छतेचे मानांकन मिळाले आहे.अशा सफाई कर्मचारी यांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग व अभय श्री.श्री.माळ मित्र मंडळातर्फे सफाई कर्मचार्यांना टिफिन चे वाटप करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे यांनी दिली.
राष्ट्रवादी सामजिक न्याय विभागाच्या वतीने व अभय श्री.श्री.माळ मित्र मंडळातर्फे शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेतील साफसफाई कर्मचार्यांना टिफिन वाटप करताना आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अभय श्री श्री माळ,अंकुश मोहिते,दीपक परदेशी,संजय दिवटे,रोहित कटारिया,अनिल वाघमारे,दीपक मोहिते,गुलाब गाडे व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभय श्री श्री माळ म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत मनपातील साफसफाई कर्मचार्यांना टिफिनचे वाटप करण्यात आले. साफसफाई कर्मचार्यांचे कोविड काळात महत्त्वपूर्ण योगदान होते, अशा कोरणा योग यांचा आज शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक छोटी भेट देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment