स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. अनिल राठोड यांची सामाजिक उपक्रमांची परंपरा त्यांच्या पश्च्यातही चालू- विक्रम राठोड
500 भाजी विक्रेते व गरजूंना दर्जेदार मोठ्या छत्र्यांचे वाटप
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्याचे पर्यटन मंत्री व युवकांचे मार्गदर्शक आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शहरात लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. अनिल राठोड यांची सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस सजरा करण्याची परंपरा त्यांच्या पश्च्यात आम्ही चालू ठेवली आहे. करोनाचा धोका अद्याप गेलेला नाहीये यासाठी सर्वसामान्यांना मास्क व सॅनीटायझरचेही वाटप केले आहे. सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने शहरातील 500 भाजी विक्रेत्यांना व गरजूंना दर्जेदार मोठ्या छत्र्यांचे वाटप केले आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी केले.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शहर युवासेनेच्या शिक्षकसेनेच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. चितळेरोड, लक्ष्मिकारंजा परिसरातील 500 भाजी विक्रेते व गरजूंना दर्जेदार मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विक्रम राठोड बोलत होते. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, संजय शेडगे, संतोष गेणप्पा, गिरीश जाधव, नगरसेवक दत्ता कावरे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, शहर प्रमुख पारूनाथ ढोकळे, गौरव ढोणे, अशोक दहिफळे, निलेश भाकरे, काका शेळके आदींसह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिपीप सातपुते म्हणाले, लोकनेते स्व. अनिल राठोड दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर गरजूंना छत्र्यांचे वाटप करत असत. याही वर्षी हा उपक्रम राबवत आहोत. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त केडगाव येथे व्रुक्षारोपण केले आहे.यावेळी प्रशांत भाले, अभिषेक भोसले, दीपक कावळे, मुन्ना भिंगारदिवे, सुमित धेंड, श्याम सोनवणे, अक्षय नागापुरे, विशाल लोळगे, अमित लड्डा, विकी पवार, मंगेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment