दर्जेदार कामे झाली तरच निधीचा विनियोग झाल्याचे समाधान मिळते ः निखिल वारे
इंद्रप्रस्थ कॉलनीत कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्र.2 हा खूप मोठा असला तरी प्रत्येक कॉलनीचा, उपनगराचा विकास करणे आमची जबाबदारी आहे. चारही नगरसेवकांचा प्रभागातील प्रश्नांबाबत एक विचारअसल्याने कामे मार्गी लागतात. दर्जेदार कामे झाली तरच निधिचा विनियोग झाल्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
शिलाविहार जवळील इंद्रप्रस्थ कॉलनीत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ श्री.वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, भास्करराव सांगळे, बाळासाहेब म्हस्के, नरेंद्र बोठे, गणेश पोतदार, बाळासाहेब करंजुले, बाळासाहेब तिमोणे, प्रसाद साळी, सुभाष कोळी, शशिकांत पालवे, सौरव गांगर्डे, विनित पोकळे, सविता मोरे, मंगला बोठे, सचिन वारे, सचिन लोटके, सचिन गाडे आदि उपस्थित होते.
श्री.वारे पुढे म्हणाले, आम्ही सर्व नगरसेवक प्रभागात कामे करताना दर्जेदार कामांना प्राधान्य देतो. एवढ्या मोठ्या वार्डातील छोटे-छोटे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतो. कामे करतांना नागरिकांचे सहकार्य कायम मिळते. त्यामुळे ती पूर्ण होतात. रुपालाताई वारे, संध्याताई पवार यांनी आपली मनोगत व्यक्त करताना सांगितले. प्रभागात रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज प्रश्नांला प्राधान्य दिले. नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांनी आपल्या भाषणात मनपाकडून आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून खूप कामे मार्गी लागले. त्यामुळे प्रभागाचा कायापालट होत आहे, असे सांगितले.
बाळासाहेब पवार यावेळी म्हणाले, कि आमच्या कामांचा अनुभव नागरिकांना असल्याने त्यांनी पुन्हा आमच्या घरातील व्यक्तीला निवडून दिले. यावेळी कॉलनीतील महिला भगिनी, नागरिक उपस्थित होते. शेवटी भास्करराव सांगळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment