समितीच्या अहवालानंतर जुनी पेन्शनचा निर्णय; शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा सुरूच - सुनील गाडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

समितीच्या अहवालानंतर जुनी पेन्शनचा निर्णय; शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा सुरूच - सुनील गाडगे

समितीच्या अहवालानंतर जुनी पेन्शनचा निर्णय; शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा सुरूच - सुनील गाडगे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त व 2005नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना तातडीने जाहीर करावी, अशी मागणी  शिक्षक भारतीने केली असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली. तथापि या प्रश्नासंदर्भात अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतरच सकारात्मक निर्णय होऊ शकणार आहे. शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी  वित्त सचिवांची भेट घेऊन केलेल्या चर्चेतून हे स्पष्ट  झाले आहे
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचारी तसेच मयत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने जुनी पेन्शन जाहीर करावी अशी मागणी शिक्षक भारतीने  केली असता वित्त सचिव यांनी चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक धोरण असल्याचे सूतोवाच केले.
राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदांवर व तुकड्यांवर नियुक्त सुमारे 25 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरात शिक्षक भारती संघटनेकडून अनेक आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्र विधानमंडळ  सचिवालय सभापतींनी दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत करण्यासाठी 24 जुलै 2019 ला एक संयुक्त समिती गठीत करण्यात आली परंतु दोन वर्षे उलटत आले तरी समितीचा अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. समीतीने आपला निर्णय तात्काळ दयावा अशी मागणीच  शिक्षक नेते सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,  मोहमंद समी शेख, योगेश हराळे, जितेंद्र आरु, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, महेश पाडेकर, कैलास रहाणे, महादेव डोंगरे, किशोर डोंगरे. संभाजी पवार,हनुमंत  रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, महादेव कोठारे, राजेंद्र जाधव, सिकंदर शेख, प्रकाश मिंड, संतोष शेंदुरकर ,किसन सोनवणे, नानासाहेब काटे, मुकुंद आंचवले, विलास माने, शरद कारंडे, राजेंद्र हिरवे, विलास वाघमोडे, प्रकाश तनपुरे, अनिल लोहकरे, बबनराव गायकवाड, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे,संजय भूसारी,शंकर भिवसने,  महिला जिल्हाध्यक्ष आशा   मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment