ग्रामसुरक्षा दलात मोबाइल यंत्रणेमुळे होणार मोठी मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

ग्रामसुरक्षा दलात मोबाइल यंत्रणेमुळे होणार मोठी मदत

 ग्रामसुरक्षा दलात मोबाइल यंत्रणेमुळे होणार मोठी मदत

घारगाव येथे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः अलीकडे सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबइल आलेले आहेत मोबाइलच्या माध्यमातून आता गाव आणि शहर हे जास्त अ‍ॅक्टिव्ह होणार आहे . कोणतीही घटना असो त्याबाबत माहिती द्यायची असेल , कुणालाही कोणतीही मदत हवी असेल , तर आता ग्रामसुरक्षा समितीच्या माध्यमातून फक्त एका फोन कॉलवर ही मदत तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे , अशी माहिती बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत घारगाव येथे अक्षदा मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक गोरडे यांच्या मार्गदर्शनखाली झालेल्या सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या कार्यशाळेत दिली. या कार्यक्रमासाठी दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्ताजी जगताप, सौ. अरुणा खोमणे प्रमुख अतिथी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना गोरडे यांनी सांगितले की सध्या सर्वांच्या जवळ अँड्रॉइड फोन आहेत याच फोनच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत आपल्या परीसरात कुठलीही अनुचित घटना घडली असता त्याबाबत माहिती द्यायची असेल,बकुणालाही कोणतीही मदत हवी असेल तर आता फक्त एका फोन कॉल वर ही मदत तात्काळ मिळू शकते. ग्रामसुरक्षा यंत्रणा आपल्या गावात कशी कार्यान्वित करायची याबाबत नाशिक येथील या यंत्रणेचे संचालक गोरडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य  यांना मार्गदर्शन करत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे माहिती दिली. ही यंत्रणा गावोगावी कार्यान्वित झाल्यानंतर चोरी, दरोडा,आग,जळीताच्या घटना,लहान मुले हरवणे,शेतातील पिकांची चोरी,वन्यप्राणी हल्ला,गंभीर अपघात,पूर,भूकंप यासारख्या  आपत्तीच्या घटनांमध्ये एकाचवेळी सर्व गावाला सूचना देणे,सावध करणे अथवा एकाचवेळी सर्वाना मदतीसाठी बोलावता येणे शक्य होणार असल्याची माहिती दिली.

No comments:

Post a Comment