मिठी मारली; गुन्हा दाखल.
मैत्रीसाठी कॉन्स्टेबलचा महिलेवर दबाव
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण थांबावे यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रत्येक शासकीय आणि खाजगी आस्थापनेत महिला लैंगिक अत्याचार निवारण समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असताना ही समिती फक्त कागदोपत्रीच असून आजही कामावर असताना महिलांना त्रास दिला जात आहे. अकोला तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलने मिठी मारुन माझ्याशी मैत्री कर अशी मागणी महिला पोलीस कर्मचार्यावर केल्याने खळबळ उडाली आहे. या कर्मचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव हे रात्री कामावर असताना महिला पोलीस कर्मचार्यावर माझ्याशी मैत्री कर, असे म्हणून त्या महिला कर्मचारी यांचा हात ओढून जवळ घेऊन मिठी मारली होती. या घटनेनंतर घाबरलेल्या पोलीस महिलेने तत्काळ वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतर आघाव याने लेखी माफी मागत पुढे असे काही करणार नसल्याचे सांगितले. तर पोलीस महिलेने बदलीची मागणी केली. दरम्यान या नंतर प्रकरण शांत झाले असे वाटले होते पण आघाव याने पुन्हा त्या महिलेची छेडछाड केली. त्यामुळे या महिलेने थेट नगर मुख्यालय गाठत वरिष्ठांकडे तक्रार केली.
संबंधित महिला कर्मचार्याने जिल्हा पोलीस कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेने नगर पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपी हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव याच्यावर राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment