उपनगराच्या विकासाला चालना देणारे नेतृत्व आ.संग्राम जगताप- संपत बारस्कर
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू केले.शहराचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी सर्वांची मते जाणून घेतली जातात, विकासाचे काम करत असताना नियोजनबद्ध जमिनीअंतर्गत भुयारी गटार योजना,पाणी योजनाचे कामे मार्गी लागल्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेतली पुन्हा पुन्हा एकच काम करण्याची वेळ येऊ नये यासाठीचे नियोजन केले जात आहे. शहराला जोडणार्या डीपी रस्त्यांच्या विकास कामाला प्राधान्य क्रम दिल्यामुळे शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यामुळेच उपनगराच्या विकासाला चालना देणारे नेतृत्व म्हणजे आमदार संग्राम जगताप असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या विशेष प्रयत्नातून नंदनवन नगर येथे रस्ता डांबरीकराणाचा कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण,नगरसेविका दीपाली ताई बारस्कर, सुमीत कुलकर्णी,संजय माने,अशोक दाणी, गोरख कजबे,प्रवीण आंनदकर, मच्छिंद्र उफाडे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच शहराच्या विकासाला चालना देत आहे.शहर विकास कामांमध्ये कुठलेही पक्ष राजकारण न आणता सर्व भागाचा समतोल विकास साधला जात आहे आहे. शहर विकासामध्ये विविध मान्यवरचे व नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे. यापुढील काळातही शहर विकासासाठी कटिबद्ध आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधावा हेच ध्येय डोळ्यासमोर आहे त्यासाठी वाटचाल करीत आहे असे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment