शहरात फक्त 44 कोरोना पॉझिटिव्ह.
आज पुन्हा नगरकरांना दिलासा; जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत आज मोठी घट झाल्याने जिल्हा वासियांना मोठा दिलासा मिळाला. मागील 3 महिन्यापासूनच हा सर्वात निच्चांकी आकडा असून जिल्ह्यातील जनजीवन पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज जिल्ह्यात फक्त 771 रुग्ण आढळले आहेत. नगर शहरात केवळ 44 कोरोना रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.
काल गुरुवारी एकुण रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर आज पुन्हा 555 ने घट झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वोच्च स्थानावर श्रीगोंदा तालुका आहे. मात्र ती आकडेवारी 80 असल्याने दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे आज सर्व तालुक्यात आढळलेल्या बाधितांची आकडेवारी दोन अंकी व 80 च्या आत आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दरदिवशी आढळणार्या कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला आहे. नागरिकांनी असाच संयम ठेवला तर नगर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त झालेला दिसेल. मात्र यासाठी सर्वांनी नियम पाळणे महत्वाचे आहे. आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 407 तर अँटीजेन चाचणीत 343 असे 771 कोरोना बाधित आढळून आले. आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- श्रीगोंदा 80, पारनेर 74, पाथर्डी 70, शेवगाव 63, श्रीरामपूर 62, कर्जत 54, राहुरी 54, नेवासा 48, संगमनेर 48, कोपरगाव 46, नगर शहर 44, अकोले 39, राहाता 35, नगर ग्रामीण 26, जामखेड 20, इतर जिल्हा 08 असे कोरोना बाधित आढळले आहे. प्रत्येकाने संयम पाळत नियमित मास्क वापरणे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करणे यासह शासकीय नियमाचे पालन केल्यास कोरोनावर आपण मात करू शकू, यासाठी सर्वांनी नियम पाळावेत.
No comments:
Post a Comment