चार ते पाच हजार लोकसंख्येच्या गावाला अवघे कोरोना लसीचे 50-50 डोस
निमगाव वाघासाठी लसीचा कोटा वाढवून देण्याची मागणी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) गावात चार ते पाच हजार लोकसंख्या असताना कोरोना लसीकरणासाठी फक्त 50-50 चे दोन डोस मिळाले. गावाचे लसीकरण होण्यासाठी लसीचा कोटा वाढवून देण्याची मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सरपंच रुपाली जाधव व ग्रामसेवक गोवर्धन राठोड यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना दिले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
निमगाव वाघात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे लसीकरण झालेले नाही. कोरोनाची तीसरी लाट येऊ नये, यासाठी जास्तीत-जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने, अनेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना लसीकरण केंद्रावर येऊन घरी जावे लागत आहे. तर लसीकरण केंद्रावर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. अनेक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित असल्याचे ग्रामपंचायतच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment