नगर शहराच्या फेज 2 व अमृतपाणी योजनेमुळे पुढील चाळीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटणार ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

नगर शहराच्या फेज 2 व अमृतपाणी योजनेमुळे पुढील चाळीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटणार ः आ. जगताप

 नगर शहराच्या फेज 2 व अमृतपाणी योजनेमुळे पुढील चाळीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटणार ः आ. जगताप

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातुन नागापूर बोल्हेगाव फेज 2 पाणी योजनेचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मी महापौर असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून फेस2 पाणी योजना मंजूर करून आणली याच बरोबर शहरामध्ये विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या तयार केल्या आता शहराची फेज 2 पाणी योजना अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागाची फेज 2 पाणी योजना सुरू केली असून यामध्ये आज नागापूर, बोल्हेगाव परिसरातील नागरिकांना फेज 2 पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. नगरसेवक कुमार वाकळे यांनी याभागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरवठा केल्यामुळेच आज हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुळा धरणा वरून पाणी उपसा करणार्‍या अमृत पाणी योजनेचे कामही लवकरच मार्गी लागेल.नगर शहराचा पुढील चाळीस वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
नागापूर बोल्हेगाव परिसराचा फेज 2 पाणी योजनेचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,नगरसेवक ड.राजेश कतोरे, सरपंच दत्ता पाटील सप्रे, हनुमान कातोरे, हभप. भीमसेन कोलते महाराज, राधाकिसन कातोरे, तुकाराम कातोरे महाराज, मोहन पडोळे, महाराज, साहेबराव सप्रे, रुपेश कळमकर, रुपेश वाकळे,नरेश पवार,सनी वाकळे, बाळू वाकळे, दत्तात्रय वाकळे, रंगनाथ वाटमोडे, नानाभाऊ वाटमोडे, ज्ञानदेव कापडे, आदिनाथ सप्रे, सुभाष कातोरे महाराज, राजू सप्रे आहे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले की, नागापूर-बोल्हेगाव परिसराचा पाणीप्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता, हा प्रश्न सुटावा यासाठी महापालिका प्रशासन व आ .संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरवठा केल्यामुळे आज हा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. बोल्हेगाव, नागापूर परिसराची लोकवस्ती विकास कामामुळे झपाट्याने वाढत आहे. आता या फेस 2 पाणी योजनेमुळे याभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.तसेच नागरिकांना पूर्ण दाबाने आता पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment