नगरचे नाव अंबिकानगर करण्यात यावे मनसे विद्यर्थी
सेनेच्या वतीने कायनेटिक चौकात फलक लावून निदर्शनेनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जयंती निमित्त व अहमदनगर शहराचे वर्धापन दिना निमित्त महाराष्ट नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे या मागणीसाठी कायनेटिक चौक येथील सर्कल ला नामांतराचे फलक लावून आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना सुमित वर्मा म्हणाले कि आजपासून आम्ही नगरच्या नामांतराचा विषय खर्या अर्थाने मार्गी लावणार आहोत. यापूर्वी पासून आमची मागणी होती कि या शहराचे नाव अंबिकानगर करण्यात यावे आता यासाठी नगरच्या सर्व जनतेने आमच्या मागे उभे रहावे. आज आम्ही फक्त याच चकात नामांतराचे फलक लावले काही दिवसातच ते प्रत्येक ठिकाणी दिसतील असे ते म्हणाले . औरंगाबाद च्या नामांतर बाबतही मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर मध्ये आंदोलन करण्यात आली होती. परंतु आता नगरचे अंबिकानगर करावे यासाठी आम्ही प्रयन्त करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. अहमदनगर चे पूर्वी अंबिकानगर असे नाव होते. त्याचे दाखले शिव स्वराजात देखील मिळतात यावेळी कायनेटिक चौकात भव्य फलक लावण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, स्वप्नील वाघ, प्रमोद ठाकूर, योगेश गुंड, प्रकाश गायकवाड, गौरव जगदाळे, ओकार काळे, पांडुरंग काळे, महादेव दहिफळे आदी उपिस्थत होते.
No comments:
Post a Comment