जुन्या वादातून कोयत्याने वार.
3 जणांवर 307 चा गुन्हा दाखल
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जुन्या भांडण्याच्या रागातून एका मुलांवर कोयत्याने वार करत कुटूंबातील व्यक्तींना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणेसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेल्वेस्टेशन येथील मदीना फिरोज पठाण यांनी फिर्याद दिली आहे.
रेल्वेस्टेशन परिसरातील इंगळे वस्ती परिसरात ही घटना घडली.स्वप्नील पोपळघट (पुर्ण नाव माहीत नाही), महेश साळवे (पुर्ण नाव माहीत नाही), आकाश शांतीलाल साळवे (सर्व रा. इंगळे वस्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल गुरूवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या कुटूंबातील सदस्या घरासमोर बसले होते. त्यावेळी, स्वप्नील पोपळघट, महेश साळवे, आकाश शांतीलाल साळवे आले. त्यावेळी जाधव याने मागील भांडनाच्या कारणावरुन आम्हाला शिवीगाळ दमदाटी करु लागले. त्या वेळी माझे पती फिरोज यांनी त्यांना तुम्ही शिवीगाळ का करता असे विचारले. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यातील महेश साळवे व आकाश शांतीलाल साळवे यांनी त्यांच्या हातातील लाकडी खोर्याच्या दांडक्याने माझे पती फिरोज यांच्या डोक्यात पाठीला मारहाण केली. त्या वेळी मी व माझा मुलगा वाहीद हा मध्ये गेलो असता त्यांनी मला देखील लाकडी दांडक्याने मारहाण करुन माझा मुलगा वाहीद यास शुभम जाधव व स्वप्नील पोपळघट यांनी त्यांच्या कमरेला लावलेले कोयते काढुन माझा मुलगा वाहीद याच्या पाठीवर व पोटावर वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
No comments:
Post a Comment