साकतखुर्द येथे बुधवार पासून सात दिवस जनता कर्फ्यू
नगरी दवंडी / प्रतिनिधी
अहमदनगर : नगर तालुक्यातील साकतखुर्द येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि. 5 मे दु. 12 वाजलेपासून ते मंगळवार दि. 11 मे रात्री 12 वाजेपर्यंत ग्रामस्तरीय समितीच्या वतीने सात दिवसांचा स्वयंउत्स्फूर्त जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. सोमवारी ( दि.3) झालेल्या सभेत हा ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच जाईबाई केदार, उपसरपंच बाबासाहेब चितळकर, ग्रामसेवक मनीषा सुडके, तलाठी महादेव शेलार, पर्यवेक्षक जोगळेकर साहेब, आशा सेविका स्वाती पाठक, अं. सेविका मिना गायकवाड, आशा बोचरे, शिपाई सिदु केदारे, बापू केदारे, अविनाश निमसे उपस्थित होते.
दरम्यान साकतखुर्द येथे गेल्या महिना भरापासून कोरोनाने कहर केला असून 45 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे
या कालावधीत मेडिकल, दवाखाना, दूध वगळता अन्य व्यवहार बंद राहणार आहेत. गावातील नागरिकांनी कोव्हीड नियमांच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment