पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांचा सत्कार
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्र. 12 मधील पाचलिंब गल्ली येथील पिण्याचा पाण्याचा अनेक दिवसांपासूनचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांचा परिसरातील नागरिकांच्यावतीने सत्कार करुन आभार मानण्यात आले. याप्रसंगी, महेंद्र गोयल, अजहर पटवेकर, अमीर खान, अनुप आसेरी, लखन पवार, तारीक कुरेशी आदि उपस्थित होते.
माळीवाडा परिसरातील प्रभाग 12 मधील पाचलिंब गल्ली भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मागील काही महिन्यांपासून फेज-2 व अमृत योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आल्याने या भागातील पाईपलाईनमध्ये बिघाड झाला होता. त्यात उन्हाळा असल्याने टाकीतून होणारा पाणी पुरवठाही कमी होत. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी मनपा पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधून कल्पना दिली व समक्ष पाहणी करुन उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या त्यानंतर तातडीने कामास सुरुवात होऊन फॉल्ट काढून नियमित पाणी पुरवठा सुरु झाला. अनेक दिवसांपासूनचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांचे आभार मानण्यात आले.
No comments:
Post a Comment