कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात एक हृदयद्रावक घटना
नगरी दवंडी
शिर्डी शहर प्रतिनिधी :
राज्यात कोरोना महामारीचे प्रचंड मोठे संकट उभे असताना अशातच कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. श्री भिमा गायकवाड यांच्या हातावर पोट असणाऱ्या आदिवासी कुटुंबामध्ये जळीत झाले. कोपीच्या घरात होतं नव्हते ते सारे जळून खाक झाले. ही घटना राज्यमंत्री बच्चू कडू यांना समजताच त्यांनी कोपरगाव तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर चे कार्याध्यक्ष श्री संजय शिंदे यांना पुढील मदतीचे आदेश दिले. संदीप शिंदे यांनी तात्काळ दखल घेत दुष्काळात तेरावा महिना आलेल्या श्री गायकवाड कुटुंबाना आज त्वरित एक महिना पुरेल इतका किराणा देत या कुटुंबाचे सांत्वन केले, तसेच संबंधित महसूल कर्मचाऱ्यांना पंचनामे तसेच या कुटुंबाला पुढील शासकीय मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. गायकवाड कुटुंबावर असा नैसर्गिक घात झाला असताना प्रहार चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय शिंदे यांनी या कुटुंबाला दिलेला आधार तसेच केलेले मदतकार्याने गहिवरून जाऊन, गायकवाड कुटुंबातील माय माउलींनी शिंदे यांना आशीर्वाद दिले आहेत. या सामाजिक कामात जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, कोपरगाव तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर, राहाता तालुकाध्यक्ष दिनेश शेळके, संघटक वसंत काळे यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment