महानगरपालिकेचे जन्म मृत्यू कार्यालया मार्फत दाखले देण्यास सुरूवात- सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्कर
नगरी दवंडी
नगर - शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे मनपाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यासाठी सदरील विभागातील कर्मचा-यांच्या नेमणुक कोवीड सेंटर व कॅन्टोन्मेंट झोनमध्ये करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मनपाचे जन्म मृत्यू विभाग काही दिवस बंद ठेवण्यात आला होता. कोरोना संसर्ग विषाणूमुळे दुर्देवाने मृत्युचे प्रमाणही मोठया प्रमाणात वाढल्यामुळे शहरात त्यांच्यावर मनपाच्या वतीने अंत्यविधी केला जात आहे. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मृत्यु दाखल्याची इतर शासकीय कामासाठी अत्यंत गरज भासत आहे. हे नातेवाईक नगरसेवक, पदाधिकारी व मनपामध्ये दाखला मिळण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. तरी या नातेवाईकांची गैरसोय निर्माण होवू नये यासाठी मा.आयुक्त यांचेशी चर्चा करून जन्म मृत्यू विभाग सुरू करावा अशी मागणी केल्या नंतर मनपाचा जन्म मृत्यू कार्यालयातून दाखले देण्यास सुरूवात झाली आहे.
तरी ज्या नागरिकांना जन्म मृत्यु दाखल्याची सध्या आवश्यकता आहे अशाच नागरिकांनी गर्दी न करता कोरोनाच्या नियमाचे पालन करून माहिती सुविधा केंद्रामध्ये अर्ज दाखल करावेत. व त्या ठिकाणाहूनच दाखले घ्यावेत. या कामासाठी मनपाला सहकार्य करावे असे आवाहन सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्कर यांनी केले.
No comments:
Post a Comment