शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे सकाळी 7 ते 11 सुरु करण्याची शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे सकाळी 7 ते 11 सुरु करण्याची शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी.

 शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे सकाळी 7 ते 11 सुरु करण्याची शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी 17 मे सोमवार पासून नगर शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे हे विकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना या सर्व वस्तू जास्त पैसे देऊन घ्यावा लागत आहे. भाजी व फळे हि जास्त पैसे देऊन घ्यावा लागत आहे. एक तर लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका त्यात महागाई या मध्ये सामान्य लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यात काही जन म्हणून आपण शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे सकाळी 7 ते 11 सुरु करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुक दिलीप सातपुते यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या कडे भेट घेवून केली आहे. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता जाधव, विशाल वालकर उपस्थित होते.
याबाबत आयुक्त शंकर गोरे म्हणाले तुमची जी मागणी आहे त्यावर आता मी निर्णय घेऊ शकत नाही. तुम्हला 20 मे ते 22 मे पर्यंत थांबावे लागेल कारण सुरु करण्याबाबत 20 मे ला मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार आम्ही योग्य तो निर्णय याबात घेऊ.

No comments:

Post a Comment