माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने नगर तालुक्यातील कोविड सेंटरला 10 हजार अंडे सुपूर्त
कोरोना ची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज- अक्षय कर्डिले
नगरी दवंडी
अहमदनगर प्रतिनिधी- कोरोना रुग्णांनी नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करावा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबरोबर समाजाची काळजी करावी या कोरोनाच्या लढाईमध्ये सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे तेव्हाच आपण कोरोनाला हरवू शकतो. कोरोना रुग्णांना चांगल्या आहाराची गरज असून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्यातील विविध कोविड सेंटरला सुमारे 10 हजार अंडी वाटप केली आहे. कोरोना संकट काळामध्ये आम्ही जनतेबरोबर असून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करत आहोत नगर जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्याची खरी गरज असून प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाजपचे युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने नगर तालुक्यातील विविध कोवीड सेंटरमध्ये मधील कोरोना रुग्णांना सुमारे दहा हजार अंड्यांचे वाटप भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोहन गहिले, ज्ञानदेव शेळके,पोपट पुंड, अमोल सुरसे, प्रशांत गहीले,अमोल घाडगे, मोहन जाधव, डॉ.ससाने, नंदू गहिले आदी उपस्थित होते.
मोहन गहिले पुढे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने आरणगाव कोविड सेंटर मधील कोरोना रुग्णांना फूड प्रोटीन मिळावे या हेतूने प्रत्येक रुग्णांना पाच दिवस पुरेन असे अंडे देण्यात आले. नगर तालुक्यावर जेव्हा-जेव्हा संकट येते तेव्हा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले धावून येत असतात जनतेबरोबर राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम ते करीत असतात कोरोना संकट काळामध्ये गेली एक वर्ष शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
No comments:
Post a Comment