टाळेबंदीत अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम थांबविण्याची स्थानिक नागरिकांची मागणी अन्यथा रास्ता रोको - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 29, 2021

टाळेबंदीत अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम थांबविण्याची स्थानिक नागरिकांची मागणी अन्यथा रास्ता रोको

 टाळेबंदीत धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर

स्थानिक नागरिकांचा विरोध

मनपा प्रशासनाकडे मोबाईल टॉवरचे काम थांबविण्याची मागणी

अन्यथा 5 मे रोजी प्रेमदान चौकात रास्तारोकोचा इशारा



नगरी दवंडी

अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात विनापरवाना मोबाईल टॉवरकडे मनपा प्रशासन डोळेझाक करत असतना, टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध दर्शविला आहे. तरी देखील मोबाईल टॉवरचे काम सुरु असल्याने सदर काम थांबवून संबंधितांवर कारवाई न केल्यास पिपल्स हेल्पलाईन संघटनेच्या वतीने मनपा प्रशासनाच्या विरोधात बुधवार दि.5 मे रोजी प्रेमदान चौकात रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

शहरी भागात लोकवस्तीत मोबाईल टॉवरच्या शंभर मीटर अंतरावर राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनाने सिध्द झाले आहे. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लहरीचा दुष्परिणाम आरोग्यावर होत असतो. शहरात महापालिकेकडून परवानगी न घेता अनेक मोबाईल टॉवर उभे राहिले आहे. धर्माधिकारी मळ्यात देखील टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन मोबाईल टॉवर उभे केले जात आहे. न्यायालय बंद असल्याचा फायदा घेऊन सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवरचे काम सुरु आहे. मात्र मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

मोबाईल कंपनीकडून टॉवरच्या मोबदल्यात महिन्याला चांगले पैसे मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची पर्वा न करता हे टॉवर उभारले जात आहे. या टॉवरला परिसरातील नागरिकांचा विरोध असून, या टॉवरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने तातडीने सदर काम थांबवून अनाधिकृत टॉवर उभारणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दि.5 मे रोजी कोरोना नियमांचे पालन करुन आंदोलन करणार आहेत. मोबाईल टॉवरचे काम थांबविण्यासाठी अ‍ॅड. गवळी, ललीता गवळी, वसुधा शिंदे, प्रकाश हजारे, माधवी दांगट, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment