पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे मनसेचे बक्षिस जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 16, 2021

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे मनसेचे बक्षिस जाहीर

 पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे मनसेचे बक्षिस जाहीर

मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस व लक्झरींना चिटकवले पत्रक

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत पालकमंत्री उंटावरुन शेळ्या हाकत आहे -नितीन भुतारे




नगरी दवंडी

अहमदनगर - कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास तयार नसल्याचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले. तर मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस, लक्झरी आणि शहरातील प्रवासी वाहनांना पालकमंत्री यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिसाचे पत्रक चिकटविण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या सुचनेनूसार नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन इंपिरीयल चौकातील पुणे बस स्थानक व शहरातील प्रमुख चौकात करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष साळवे, मनोज राऊत आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नितीन भुतारे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना रुग्णांना सरकारी अथवा खाजगी दवाखान्यात उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले आहे. ऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत   आहे. या संकटकाळात प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात योग्य नियोजन करीत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर येत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना जिल्ह्यात येण्यास तयार नाही. ते कधीतरी येऊन अधिकार्‍यांची बैठक घेतात, नियोजन न करता निघून जातात. उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर दररोज नगरमध्ये चाळीस ते पन्नास नागरिक कोरोनाने मृत्यूमुखी पडत असताना, मुंबई व कोल्हापूरला जाणार्‍या नागरिकांनी पालकमंत्री दिसल्यास त्यांना नगरमध्ये घेऊन येण्याचे आवाहन आहे.

No comments:

Post a Comment