रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली ः सातपुते
शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादननगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दीन ,दलित,आदिवासी ,शोषित, शेतकरी ,शेतमजूर, महिलांच्या कल्याणची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच आम्ही पुढे जात आहोत रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली असे प्रतिपादन शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने नेता सुभाष चौकात शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते,माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी शहरप्रमुख संभाजी कदम,प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संतोष गेनप्पा, दीपक खैरे, संजय शेंडगे, दत्ता जाधव, योगिराज गाडे, शिक्षक संघटनेचे अंबादास शिंदे, सचिन शिंदे, आकाश कातोरे खेडकर, मुन्ना भिंगारदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment