पत्रकाराचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी एकजण अटकेत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

पत्रकाराचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी एकजण अटकेत

पत्रकाराचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी एकजण अटकेत 


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी शहरात पत्रकाराचे अपहरण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात चौघांचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले . त्यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून , गुन्ह्यातील वाहन ताब्यात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली.
लाल्या ऊर्फ अर्जुन विक्रम माळी ( रा . राहुरी ) , असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून , कान्हू गंगाराम मोरे ( रा . वांबोरी ) , अक्षय कुलथे , तौफिक शेख अशी पसार झालेल्यांची नावे असल्याचे उपअधीक्षक मदने यांनी सांगितले . मंगळवारी ( दि. 6 ) दुपारी राहुरीतील मल्हारवाडी रस्त्यावर पत्रकार रोहिदास राधूजी दातीर ( वय 48 , रा . उंडे वस्ती , राहुरी ) यांचे
अपहरण करून त्यांची हत्या झाली . मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर एका मोकळ्या प्लॉटमध्ये टाकण्यात आला . याप्रकरणी बुधवारी रात्री म्हैसगाव परिसरातील जंगलात पाठलाग करून अर्जुन माळीला पोलिसांनी ताब्यात घेतले . त्याचा साथीदार अक्षय कुलथे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला . गुरुवारी गुन्ह्यातील जीप ( एमएच 17 एझेड 5995 ) तेलकुडगाव ( ता . नेवासे ) येथून पोलिसांनी ताब्यात घेतली .
उपअधीक्षक मदने यांनी सांगितले की , अर्जुन माळी याने प्राथमिक चौकशीत अन्य साथीदारांची नावेही सांगितली . स्थानिक गुन्हे शाखेची तीन , राहुरी पोलिस ठाण्याची दोन , श्रीरामपूर उपविभागीय पोलिस कार्यालयाचे एक , अशी एकूण सहा पोलिस पथके पसार आरोपींचा शोध घेत आहेत .

No comments:

Post a Comment