राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत रुईछत्तीसी येथे वर्धिनी फेरीचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत रुईछत्तीसी येथे वर्धिनी फेरीचे आयोजन

 राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत रुईछत्तीसी येथे वर्धिनी फेरीचे आयोजन

माजी उपसभापती रवींद्र भापकर यांचा पुढाकार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुका पंचायत समितीच्या राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत वाळकी गटातील रुई छत्तीशी, वाळुंज हिवरे झरे, गुणवाडी, या गावा मध्ये वर्धिनी फेरीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यानुसार गावातील गरीब,अनुसूचित जाती जमाती, अपंग,विधवा, परीत्यकत्या इतर समाज घटकातील महिलांचे बचत गट स्थापन करण्यात आले.  हे काम करण्यासाठी पाच वर्धिनीचा एक चमू गावामध्ये पंधरा दिवस निवासी राहून गावात मशालफेरी, कोपरा बैठका घेण्यात आल्या. तसेच प्रभावी माध्यमाचा वापर करून गृहभेटी देऊन कुटूंब सर्व्हेक्षण करून गट स्थापना करण्यात आली. गटाला बचत गटा बाबतचे फायदे तोटे आदी बाबत प्रशिक्षण दिले. बैठक कशी घ्यावी दप्तर कसे लिहावे बँक खाते तसेच इतर माहिती देण्यात आली.या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गटांना पंचायत समितीच्या माध्यमातून 15 हजार रुपयांचा फिरत निधी गटास उपलब्ध करून दिला जातो. व गट 6 महिने ते 12 महिन्याचा झाल्यानंतर एक लाख पर्यंत चे कर्ज बँके मार्फत उपलब्ध करून दिले जाते. हे अभियान प्रभावी राबविण्यासाठी पंचायत समिती माजी उपसभापती रवींद्र भापकर, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका व्यवस्थापक ज्ञानेश्वर गव्हाणे, तालुका व्यवस्थापक वैभव धनवटे, वाळकी प्रभागात प्रभाग समन्वयक शसोनाली शिंदे, तालुका व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच उपसरपंच, सदस्य व इतर मान्यवरांच्या सहकार्याने रुई गावातील वर्धिनी फेरी यशस्वीरित्या पार पडली.

No comments:

Post a Comment