हातावर पोट भरणार्यांना कोरोनाच्या लढ्यात उपाशी ठेवु नका- शरद पवळे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः आज देशावर ओढवलेल्या कोरोणा महामारीच्या संकटात सर्व सामान्य गोरगरीब जनता हवालदिल झालेली आहे खाण्या पिण्याचे वांधे झालेले असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आधार फाउंडेशनसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुपा परिसरातील हातावर पोट असलेल्या गोरगरीबांना सामाजिक बांधिलकी जपत फळे वाटप केले. व समाजातील दानशुर व्यक्तींनी सुरक्षितता बाळगत पुढे येवुन जनसेवा हिच खरी ईश्वरसेवा या उक्तीप्रमाणे समाजातील गोरगरीब जनतेची भुक भागवीण्यासाठी असे उपक्रम केल्यास नक्कीच भुकेलेल्याला अन्न मिळेल व आपल्याला लाख मोलाचा आशीर्वाद अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे व कोरोनाने मानवासमोर मोठे आव्हान केले असुन या महामारीत,जगण्याच्या लढाईत पैसा महत्वाचा नसुन जीवन महत्वाचे असुन आपण सुरक्षित राहत ईतरांना सुरक्षित ठेवण्याची आपली जबाबदारी असुन प्रत्यकाने आपल्या सभोवताली कुणीही उपाशी राहु नये यासाठी जागरुक राहण्याबरोबर नागरिकांनी आपल्याला कोरोनाची सुरुवातीची थोडीबहुत जरी लक्षणे असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरीत संपर्क साधावा असे मत आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे,अविनाश पवार,डॉ.पानगे,नितिन म्हस्के, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, राहुल जाधव, भैरवनाथ मोरे, दामु किसन दिवटे,मनोज गायकवाड व इतर कार्यकर्ता व महिला भगिनी यांच्या उपस्थित फळे वाटपाच्या उपक्रमावेळी आयोजकांकडुन करण्यात आले.
No comments:
Post a Comment