दत्तनगर शाळेचे निसर्ग व पर्यावरण ई बालसाहित्य संमेलन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर येथे वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या प्रेरणेने शिक्षिका ज्योती भोर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण व्हावी यासाठी ऑनलाइन ई-बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. सध्या कोरोनामुळे ऑक्सिजनला किती अनन्य साधारण महत्त्व आहे . याची जाणीव निसर्गाने करून दिली आहे . पर्यावरण रक्षण व वृक्ष संवर्धनाबाबत मुलांनी बालपणापासूनच जागृत व्हावे.हा उद्देश समोर ठेवण्यात आला.
यामध्ये मुलांनी निसर्गातील स्व अनुभव,स्वरचित कविता सादरीकरण,पर्यावरण जागृतीवर चित्रे पोष्टर्स ,घोषवाक्ये,एक झाड तुझे एक झाड माझे, पक्षी, झाडे, पृथ्वी ,हवा ,प्लास्टिक वापर हानिकारक या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शिक्षिका ज्योती भोर व मंजुषा आवारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले . ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजय कळमकर सरांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला . तर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी मुलांचे कौतुक केले. सभापती सुरेखाताई गुंड यांनी बालसंमेलनास शुभेच्छा दिल्या . तर उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी वृक्षमित्र आबासाहेब मोरे ,जि.प.सदस्य मा.संदेशजी कार्ले साहेब सभापती सौ. सुरेखाताई गुंड , उपसभापती श्री . दिलीप पवार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्री . संजय कळमकर , टशिक्षणाधिकारी श्री .चंद्रकात सोनार साहेब, विस्ताराधिकारी श्री .रविंद्र कापरे साहेब ,केंद्रप्रमुख मा श्री धामणे साहेब,मा.सरपंच हरिभाऊ कर्डिले , सरपंच मंगल गवळी, उपसरपंच आदिनाथ मोढवे पालक व विद्यार्थी यांनी ऑनलाईन उपस्थिती दाखवून संमेलनात सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment