बेड नाही! कोरोना रुग्णाचा गाडीतच मृत्यू ऑक्सीजन संपला, 2 रुग्णांचा तडफडून अंत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

बेड नाही! कोरोना रुग्णाचा गाडीतच मृत्यू ऑक्सीजन संपला, 2 रुग्णांचा तडफडून अंत.

 बेड नाही! कोरोना रुग्णाचा गाडीतच मृत्यू ऑक्सीजन संपला, 2 रुग्णांचा तडफडून अंत.

जिल्हा रुग्णालयात हलगर्जीपणाचा कहर

अहमदनगर जिल्ह्यात रेमेडेसीवरचा तुटवडा भासत आहे. रुग्णालयात बेडची देखील कमतरता आहे. बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरु आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नाही. जिल्हा प्रशासनाने रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असल्याचा दावा करत आकडेवारी जारी केलीय. मात्र, यानंतरही रुग्णांना बेडसाठी वणवण फिरावं का लागतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असताना जिल्हा प्रशासन बेड उपलब्ध का करुन देत नाहीये असाही सवाल उपस्थित होतोय.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एकाच दिवशी अनेक मृतदेह जळत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील दृष्यांनी राज्यभरात कोरोनाचं गांभीर्य वाढवलं. त्यानंतर नगरमधील आरोग्य यंत्रणांनी हालचाली करत उपाययोजना केल्याचा दावाही केला. मात्र, प्रत्यक्षात रुग्णांच्या अडचणींमध्ये काहीही फरक पडलेला दिसत नाहीये. नगरमध्ये बेड न मिळाल्याने उपचारा अभावी रुग्णाचा गाडीतच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. याबाबतची हकीकत सांगतानाचा मृताच्या नातेवाईकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हे भीषण वास्तव पाहून नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रविवारी (11 एप्रिला) रात्री जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या एका रुग्णाला त्याचे नातेवाईक उपचारासाठी अहमदनगरला घेऊन आले. मात्र, जिल्हा रुग्णालयाने त्यांना बेड नसल्याचं सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यांना थांबण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईक रुग्णाला घेऊन शहरातील इतर रुग्णालयांमध्ये गेले, मात्र त्यांना कुठेच बेड मिळाला नाही. अखेर बेड शोधण्यासाठी कोरोना रुग्णाला घेऊन फिरत असतानाच या रुग्णांचा मृत्यू झाला.
ऑक्सिजनविना दोन रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप -  अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी कोलाय. दरम्यान मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतल्याने तातडीने ऑक्सिजनची टाकी बदलण्यात आली. नातेवाइकांच्या सतर्कतेमुळे इतर दोघांचा जीव वाचला.
मुर्दाड प्रशासनाचा हलगर्जीपणा, ऑक्सिजन सिलेंडर संपला पण कर्मचार्‍यांचं लक्षच नाही - जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड वॉर्डमधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी टाकी संपली. ही टाकी संपण्याआधीच नवीन टाकी जोडणे अपेक्षित होते. परंतु, अर्धातास उलटूनही कर्मचार्‍यांनी ऑक्सिजन टाकी बदलली नाही. त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने एका आजोबांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाइकांनी केला. तर दुसर्‍या पेशंटला त्रास होवू लागल्याने त्याला आयसीयूत हलवले मात्र उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विशाल लोळगे आणि इतरांनी रुग्णालयात धाव घेतली. ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी इतर रुग्णांकडे विचारणा केली. इतर रुग्णांनीदेखील ऑक्सिजन 15 ते 20 मिनिटांपासून बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे लोळगे यांच्यासह आजोबाच्या नातेवाइकांनीही टाकी बदलण्यासाठी कर्मचार्‍यांचा शोध घेतला. मात्र कर्मचारी बाहेर गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. हा सर्व घटनाक्रम लोळगे यांनी मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद केला. ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालयात एकच धावपळ उडाली. कर्मचार्‍यांचा शोध घेऊन तातडीने टाकी बदलण्यात आली. मात्र या दरम्यान 2 रुग्णांना प्राण गमवावे लागले, तर सतर्कतेमुळे इतरांचे प्राण वाचले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचं भीषण वास्तव आहे. अहमदनगरमध्ये काल 1998 नवे कोरोना रुग्ण आढळले. सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार पार झालीय. एकुण रुग्णसंख्या 1 लाख 18 हजार 45 झाली असून सक्रीय रुग्ण 13500 आहेत.

No comments:

Post a Comment