ना.प्राजक्त तनपुरेंकडुन गांधी कुटुंबियांचे सांत्वन....
शासकीय इतमात अंत्यसंस्कार का नाही, चौकशी करणार
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भाजपचे जेष्ठ नेते स्व.दिलीप गांधी यांनी खासदार म्हणून खूप चांगले काम करत नगर जिल्ह्याच्या विकासात भर घातली आहे, तनपुरे कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, अशा शब्दात नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. गांधीवर शासकीय इतमात अंत्यसंस्कार का झाले नाहीत या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्व. दिलीप गांधी यांच्या कुटुंबाचे घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी सुवेंद्र गांधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे जेष्ठनेते घन:श्याम शेलार, जी.प सदस्य बाळासाहेब हराळ, रोहिदास कर्डिले, आंबादास गरुडकर आदी उपस्थित होते. यावेळी अॅड. अभिषेक भगत यांनी दिलीप गांधी यांच्यावर अमरधाम मध्ये शासकीय इतमात अंत्यसंस्कार झाले नसल्याचे मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आ.राधाकृष्ण विखे यांनीही गांधी कुटुंबांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गांधी यांनी गल्ली ते दिल्ली केलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी शहर अध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment