सामाजिक संघटनांचे खा. सुजय विखेना निवेदन...
नगरकरांच्या भावना केंद्राला कळवा!
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी मागील एक दशकापासून अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना प्रयत्नशील आहे. सदर प्रश्नी केंद्र सरकारसह रेल्वे विभागाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या रेल्वे रोको आंदोलनात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरा देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागृक नागरिक मंच, हर दिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाउंडेशन, फिनिक्स फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संघटना सहभागी होत आहे. या जन आंदोलनात शहरातील विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांना देखील सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तरी लोकप्रतिनिधी म्हणून संपुर्ण नगरकरांच्या भावना केंद्र सरकारला कळवून या रेल्वेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी संघटनेच्या वतीने खासदार विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.विखे यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन, सदर प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका बैठकनिमित्त आलेले खासदार विखे यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. अहमदनगर-पुणे रस्त्यावर सातत्याने वाढत असलेल्या वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे-नगर प्रवासाचा वेळ वाढून तो चार तासांहून अधिक झाला आहे. सध्या हा मार्ग चौपदरी आहे, मात्र तो कमी पडत आहे. त्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच अहमदनगर-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू केल्यास इंधनाची बचत तर होणार आहेच, पण विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदार वर्गाला यामुळे सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांचा नगर-पुणे प्रवास सुरु आहे. ही रेल्वे सेवा सुरु झाल्यास दोन्ही शहराच्या दृष्टीने सोयीचे होऊन रेल्वे विभागाला देखील आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
मागील 11 वर्षांपासून तत्कालीन रेल मंत्री मा. सुरेश प्रभू, मागील टर्म मध्ये मा.ना. पियुष गोयल, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, सोलापूर विभागाचे रेल्वे मॅनेजर अशा अनेक लोकांनी आश्वासन दिले, त्यात विद्युतीकरण संपल्यावर, ततपश्चात कॉडलाईनचे काम झाल्यावर आणि मागील वर्षी दौंड येथे बाय पास येथे रेल्वे स्थानक झाल्यावर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याचे अश्वशान देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन पाळले गेले नसल्याने जन आंदोलनाच्या माध्यमातून अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने पुढाकार घेऊन शनिवार दि.13 मार्च रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी संघटनेचे हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अशोक कानडे, सुहास मुळे, सुनिल छाजेड उपस्थित होते. खासदार विखे यांनी सदर रेल्वेचा प्रश्न दि.20 फेब्रुवारी 2020 मध्ये अधिवेशनात मांडण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हा प्रश्न प्रलंबीत राहिला. अहमदनगर ते पुणे शटल रेल्वेसाठी पुढील पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment