उगवत्या पिढीने वाचन संस्कृती अंगिकारावी ः राठोड
अ.नगर जिल्हा वाचनालयात मराठी भाषा दिन साजरा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मानवी जीवनात वाचनाचे, ग्रंथाचे व लेखकांचे योगदान अमुल्य आहे. सुशिक्षित माणसाला सुसंस्कृत बनविण्याचे त्याची मानसिक जडण-घडण करण्याचे काम ग्रंथ करतात. सामान्य माणसाला असामान्य करण्याचे सामर्थ्य वाचनात असल्याने उगवत्या पिढीने वाचन संस्कृती अंगिकारावी, असे आवाहन अ.नगर जिल्हा वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले.
कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर जयंती व मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अहमदनगर जिल्हा वाचनालयात आयोजित या कार्यक्रमात राठोड यांच्या हस्ते सरस्वती पुजन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ग्रंथपुजन करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष अजित रेखी, संचालक राहुल तांबोळी, ज्योती कुलकर्णी, दिलीप पांढरे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, वाचक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा.ज्योती कुलकर्णी तर आभार अजित रेखी यांनी मानले.
No comments:
Post a Comment