शहरातील या गुंडा विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
नगरी दवंडी
अहमदनगर - नगर येथील बालिकाश्रम परिसरात व्यवसाय करीत असलेल्या व्यवसायीकांवर गुन्हेगारी व अपप्रवृत्तीच्या गुंड व्यक्तींकडून दि.20 मार्च रोजी दुकानात घुसुन धुडगुस घालुन मारहाण करण्यात आली व खंडणीची मागणी करण्यात आली. यावर येथील अक्षय राजेंद्र जाधव यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांना निवेदन देऊन या गुंडाचा बंदोबस्त करण्याची लेखी मागणी केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, रुबाब मेन्स वेअर या फर्मच्या नावाने बालिकाश्रम परिसरामध्ये व्यवसय मी करीत आहे. माझा वाढता व्यवसाय पाहून व त्यावर सतत लक्ष देऊन गुन्हेगारी व अपप्रवृत्तीच्या गुंड व्यक्तीकडून दि.20 रोजी सयंकाळच्या दरम्यान, अनाधिकाराने घुसून लोखंडी रॉड, लाकडी दांडके, याद्वारे मला व माझे दुकानातील कामगारांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करुन दुकानाचे तोडफोड करुन नुकसान करुन खंडणी मागण्याचा प्रकार झालेला आहे.
यावर मी गुन्हा दाखल केला असून खंडणीसारखा भयानक बेकायदेशीर प्रकार दुपारच्या सुमारास 3.30 ते 4.00 या वेळेत घडतो. नगर शहरासह परिसरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले हे नगरमधुन तडीपार केलेले गुन्हेगार विजय राजु पठारे, सुरज साहेबराव साठे, राहुल अनिल झेंडे, मयूर राजू चावरे व अक्षय शिरसाठ व त्यांचे साथीदार संघटीतपणे गुन्हेगारी करुन राजरोसपणे भर दुपारी दुकानात घुसून खंडणी मागुन दुकाराची तोडफोड करतात. यावर गुन्हे दाखल असतानाही अद्यापही आरोपी मोकाट असल्याने पोलिस आरोपींना पाठीशी घात नाही ना असाच प्रश्न निर्माण होत आहे. आरोपींना तातडीने अटक करावी अशी आमची मागणी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी अक्षय जाधव,अजय साळवे,ऋशाल साळवे,प्रवीण साळवे,किरण पटेकर, सुनील साळवे,विनोद साळवे,ऋतिक साळवे,रविराज साळवे,करण साळवे,किरण पवार,महेंद्र जाधव,महेंद्र साळवे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment