परीक्षार्थींचा उद्रेक! सरकार नरमले! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

परीक्षार्थींचा उद्रेक! सरकार नरमले!

 परीक्षार्थींचा उद्रेक! सरकार नरमले!

लोकसेवा आयोगाचे सुधारित प्रसिद्धीपत्रक जाहीर; आता एमपीएससी परीक्षा 21 मार्चला.

काल दिवसभरात या सगळ्या घडामोडी सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणावर बोलणार असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून संध्याकाळी कळवण्यात आलं. त्यानुसार रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकवर लाईव्ह आले. चझडउ च्या विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, 14 तारखेची परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मी स्वतः तारखांचा घोळ संपवा, अशा सूचना सचिवांना दिल्या आहे. उद्या ही तारीख जाहीर होईल. येत्या आठवडाभरातच ही परीक्षा होईल. चझडउ ची परीक्षा देण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्याला वयाच्या मर्यादेचं बंधन येणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.पण यानंतरही विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम होते. आपण ही रात्र रस्त्यावरच झोपून घालवू, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. पण रात्री पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटवून रस्ता मोकळा करून घेतला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज परीक्षेची 21 मार्च नवी तारीख जाहीर करण्यात आली.


अहमदनगर ः
लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आल्याचं काल जाहीर केल्यानंतर राज्यातील परीक्षार्थीमध्ये मोठा उद्रेक निर्माण झाला. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांमध्ये ही याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक शहरात विद्यार्थी रस्त्यावर ठाण मांडून बसले. रास्ता रोको ही काही शहरात करण्यात आला. आज लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धी पत्रक जारी करून एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला घेण्यात येणार असल्याचं जाहीर केले आहे.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरून राज्यातील परिक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे. ही नाराजी काल स्पष्टपणे दिसून आली.
गेल्या वर्षी नियोजित असलेली ही परीक्षा तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलल्यामुळे गुरुवारी चझडउ चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे. अखेर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक फेसबुक लाईव्ह घेऊन सरकारची बाजू स्पष्ट केली. गुरुवारी सकाळी चझडउचं पत्रक आल्यापासून ते संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह होईपर्यंतच्या आठ तासांत राज्यातील वातावरण ढवळून निघालं.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी चझडउ ची परीक्षा पुन्हा एकदा काल लांबणीवर टाकली गेली. 14 मार्चला होणारी ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याचं चझडउ ने कळवलं. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं होतं. काल दुपारी एकच्या सुमारास हे पत्रक प्रसिद्धीस पाठवण्यात आलं. चझडउ ने परीक्षा पुढे ढकलल्याचं कळताच विद्यार्थ्यांमध्ये याबाबत चर्चा रंगू लागली. अखेर पुण्यामध्ये चझडउ ची तयारी करत असलेले विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. याला आंदोलनाचं स्वरुप मिळून विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडलं आणि रास्ता रोको केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाल्याचं दिसून आलं. निवडणुका घेताना, राजकीय नेत्यांच्या मुलांच्या लग्नात, राजकीय अधिवेशन, आंदोलनांमधून कोरोनाचा प्रसार होत नाही, पण चझडउ परीक्षांच्या वेळीच कोरोना कसा पसरतो, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. केंद्राच्या णझडउ, रेल्वे आणि इतर परीक्षा होत आहेत, असं असूनही राज्य सरकार वारंवार चझडउ ची परीक्षा पुढे का ढकलत आहे, असा सवालही परिक्षार्थी विचारत होते.
पुण्यानंतर राज्यात नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर आणि इतर शहरांमध्येही विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. परीक्षा रद्द करणं अत्यंत अयोग्य ठरेल, मुलं वर्षानुवर्ष मेहनत करतात, त्यामुळे परीक्षा झाल्या पाहिजेत. सरकारनं हा निर्णय रद्द केला पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.वेगवेगळ्या विभागाची कार्यालय सुरू आहेत, अधिवेशन होत आहे, परीक्षासुद्धा होऊ शकते, त्यामुळे ज्या तारखेला परीक्षा ठरली होती त्याच तारखेला घ्या,प असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ग्रामीण भागातून आलेले हे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला, असं भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी म्हटलंय.
दरम्यान, सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांच्या नेत्यांनीही या निर्णयावर टीका केल्याचं दिसून आलं.असं अचानक शेवटच्या क्षणी परीक्षा रद्द करणं योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. आधी यूपीएससीची परीक्षा झालेली आहे. काळजी घेऊन आपल्याला ही परीक्षा घेता येईल. अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरात राहण्याची सोय नाही. मी सरकारला विनंती करतो की हा निर्णय रद्द करावा, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारा निर्णय असून 3 दिवस राहिले असताना परीक्षा पुढे ढकलणं निषेधार्ह आहे. याचं समर्थन होऊच शकत नाही, तातडीने हा निर्णय बदलला पाहिजे, असं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी म्हटलं.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. हा सगळा प्रकार सुरु असतानाच राज्य सरकारमधील तीन पक्ष तसंच प्रशासन या सगळ्यांमधील समन्वयाचा अभावही स्पष्टपणे दिसून आला. या निर्णयाबाबत आपल्याला माहिती नव्हतं, अशीच प्रतिक्रिया सरकारमधील मंत्र्यांकडून येऊ लागली. महाराष्ट्रातील चझडउ च्या पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आपल्याला अंधारात ठेवून घेण्यात आलेला आहे. हा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात आला असून सरकारला याबाबत काहीच कल्पना देण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं. चझडउ कडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसर त्यांना 10 मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पत्र प्राप्त झाल्याचं नमूद केलं आहे. पण हा निर्णय सचिव स्तरावरून घेण्यात आल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी या प्रकरणातून अंग काढून घेतलं आहे.

No comments:

Post a Comment